Friday 28 October 2011

Page Not Found and Serial Killers !

येत्या महिन्याच्या ३० तारखेला ( ३० ऑक्टोबर - रविवारी ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात दोन नाटकांचे प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहेत ! सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण ! :-) :-)

१) पेज नॉट फाउंड - दीर्घांक ( आत्तापर्यंत रसिकांनी ही एकांकिका पाहिली आहे - पण आता
आम्ही त्याचा दीर्घांक बसवला आहे ! )

२) सीरिअल किलर्स - एकांकिका

दोन्ही नाटके सलग दोन वर्षे मानाचा 'पुरुषोत्तम करंडक' विजेती ठरली आहेत ! 

Saturday 17 September 2011

आजपासून - पुरुषोत्तम अंतिम फेरी !

आजपासून - पुरुषोत्तम अंतिम फेरी ! 

प्राथमिक झाली - नाटकाचा पुन्हा नव्याने विचार सुरु झाला - परीक्षकांशी भेटी-गाठी झाल्या - नाटक कुठे कमी पडते आहे ह्यावर चर्चा झाली - मधेच गणपतींचे आगमन झाले - पावसाचा भडीमार मधून मधून सुरूच होता - बाहेरगावच्या कलाकारांना गणपतींसाठी त्यांच्या गावी जायचं होतं - प्राथमिक आणि अंतिम फेरी मध्ये १७ दिवसांचे अंतर होते - ह्या सर्व घडामोडींना ओलांडून आजपासून पुन्हा पुरुषोत्तम अंतिम फेरी सुरु होत आहे ! 

प्रत्येक टीम ने नाटक अधिक चांगले होण्यासाठी नक्कीच बदल केले असतील. ह्या बदलांसाठी असलेला कालावधीही मोठा असल्याने - एरवी अवघड वाटणारी नाटकात सुयोग्य बदल करण्याची हि गोष्ट साध्यहि झाली असेल ! १७ दिवसांनतर आलेल्या अंतिम फेरीमुळे प्रत्येक नाटकाबद्दल आणि विशेषतः त्यातल्या बदलांबद्दल कमालीची उत्सुकता आहे ! प्रत्येकाला आपापली बलस्थाने आणि कमकुवत बाजू माहिती आहेत - तसेच फायनल मधल्या नाटकांचे प्रयोग कोणत्या लॉट मध्ये कोणत्या क्रमाने येतात - याचाही विचार महत्वाचा ठरेल. 

प्रत्येक नाटकाच्या कमी-जास्त बाजू थोडक्यात बघुयात ! 

१) अनामिक ( AISSMS ) - मला हे नाटक प्राथमिक मध्ये कळलेच नव्हते - म्हणजे मला ह्या नाटकाचे आकलन प्राथमिक मध्ये झालेलेच नव्हते - त्यामुळे ह्या नाटकावर मी फार बोलू शकणार नाही . पण कदाचित - जी ए कुलकर्णींच्या कथेतला आशय - ठळकपणे बाहेर येत नाहीये - असे मला वाटते. पण - कदाचित नाटकाच्या दिग्दर्शकाला जे मांडायचे आहे ते त्याने ताकदीने मांडलेलेही असू शकते - कदाचित माझीच आकलन शक्ती कमी पडतीये - हीही शक्यता नाकारता येत नाही. 

२) पेशंट ( बी एम सी सी ) - मला सर्वात जास्त आवडलेले नाटक. दिग्दर्शनात खोलात विचार केलेला जाणवतो. मनोव्यापारांचा एक सुंदर अनुभव हे नाटक देऊन जाते. मुख्य पात्राने अजून सरस अभिनय केला तर अधिक चांगला प्रयोग होऊ शकतो. नाटकातल्या प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैलीला - पूर्णपणे नाट्यानुभवात रुपांतरीत केल्यास नाटकातले अनावश्यक प्रसंग जाऊन नाटक अजून सकस होऊ शकेल ! अर्थात प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैली वापरणे हा दिग्दर्शकाचा निर्णय असू शकतो. एकुणात हि एकांकिका करंडकासाठी आणि जयराम पारितोषिकासाठी सशक्त दावेदार ठरू शकते ! 

३) इमोशनल लोचा ( व्ही आय आय टी ) - नाटकाचा विषय सध्याचा अगदी परवलीचा - हि नाटकाची सर्वात जमेची बाजू. तसेच तांत्रिक बाबींमधील सफाई - हीही जमेची बाजू. प्राथमिक नंतर - सर्वात जास्त सर्वात चांगले बदल जर एखाद्या एकांकिकेत करता येऊ शकत होते - तर ते ह्या एकांकिकेत. विषयाच्या वरवर न राहता खोलात शिरून जर मांडणी केली - तर हे नाटक खूप चांगले होऊ शकते. कलाकारांचा अभिनय साचेबंद चौकटीतून बाहेर पडायला हवा. CHARACTERS निर्माण करण्यात हि एकांकिका कमी पडत होती प्राथमिक मध्ये - त्यावर पकड मिळवल्यास हि एकांकिका सुद्धा करंडकास पात्र ठरू शकते. 

४) लॉगिंग आउट ( एम एम सी सी ) - इंटरनेट चे व्यसन - हा सध्याचा विषय ! पात्रांचे सुरुवातीचे संवाद खूप जास्त निवेदनात्मक - वर्णनात्मक आणि अनावश्यक वाटतात. दोघेही कलाकार काम चांगले करतात - पण मुलगी सरस - अर्थात मुलाला म्हणावी तशी 'भूमिका' च नसल्याने - त्याकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. नेपथ्य चांगले. नाटकाची तीव्रता बाहेर पडत नाही - हि नाटकाची कमकुवत बाजू. गेल्या १७ दिवसांमध्ये ह्या बाबींवर हवे ते बदल झाले असावे अशी अपेक्षा आहे. 

५) दुमला ( सिंहगड अभियांत्रिकी अकादमी ) - कथेतला वेगळेपणा , सर्वांचा उत्तम अभिनय - मनोव्यापारांच्या मध्ये फुलणारे नाट्य - आणि उत्तम सादरीकरण - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू ! तांत्रिक बाबींमध्ये अजून सफाई अपेक्षित आहे - त्यातही पार्श्व संगीताच्या आवाजाच्या पातळीमध्ये बदल करणे गरजेचे आहे - पात्रांमध्ये घडणारे नाट्य - नक्की कोणत्या शतकात घडते आहे ह्यावर बारकाईने विचार होणे गरजेचे वाटते. 

६) हे देअर देलायलाह ( एस सी ओ इ ) - दणकेबाज - विनोदी ढंगाचे सादरीकरण - चांगला अभिनय - चांगले पार्श्व संगीत - आणि 'गमतीदार' ( ?? ) मांडणी - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू. नाटकातल्या मूळ विचाराच्या मधला वरवरपणा - यावर विचार होते खूप गरजेचे आहे. 

७) सिरीयल किलर्स ( एम आय टी सी ओ ई ) - विषयाच्या अजून खोलात शिरणे गरजेचे आहे. प्राथमिक मध्ये नाटक फक्त प्रसंगान्पुरातेच मर्यादित राहत होते. नाटकातला आशय प्रसंगांच्या कक्षा ओलांडून बाहेर येणे गरजेचे वाटते ! 

८) चेकमेट ( सी ओ ई पी ) - Non linear treatment ( w.r.t time line ) - हे नाटकाचे वैशिष्ट्य ! पण प्राथमिक मध्ये नाटक या वैशिष्ट्या पर्यंतच मर्यादित राहत होते - नाटक त्यापलीकडे जायला हवे. प्राथमिकला  'अप्रतिम घड्याळाचे नाटक ' ह्या शिक्क्यातून नाटक बाहेर पडावे अशी अपेक्षा ! 

९) अन्वय ( कमिन्स कॉलेज ऑफ इन्जिनिअरिन्ग ) - द लास्ट लीफ - ह्या कथेचे केलेले उत्तम नाट्यरुपांतर , मुख्य पात्रांचा उत्तम अभिनय - दिग्दर्शनातले बारकावे - चांगले नेपथ्य - आणि सर्वच कलाकारांचा खणखणीत आवाज - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू. पण नाटक माणसाच्या प्रवृत्तीन्पर्यंत जाण्यात कमी पडते - त्यामुळे शेवटी फक्त कथेचे उत्तम नाट्य रुपांतर एवढेच लक्षात राहते - इथे बदल करणे गरजेचे आहे. 

सर्वच स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा !  भारत नाट्य मंदिर चा रंगमंच कलाकारांच्या अप्रतिम अदाकारीने नाहून निघू देत - अशी देवाकडे प्रार्थना ! तसेच ह्या अप्रतिम सोहळ्याला - स्पर्धेच्या निकालानंतर कोणतेही गालबोट न लागो अशीही प्रार्थना ! 

स्पर्धेचा निकाल काहीही लागो - आपण तो खिलाडू वृत्तीने स्वीकारुयात ! शेवटी स्पर्धा आपली आपल्याशी - आणि जर असे असेल तर निकाल काहीही लागला तरी त्याचे दुख्ख किंवा वाजवीपेक्षा जास्त कौतुक कशाला ! :-)  

Tuesday 30 August 2011

Revised Ratings and probable plays in the final

Hello All

Thanks for reading my reviews patiently.

Today is the last day at Purushottam. Throughout the competition we experienced lot of good performances and some very innovative concepts. It's time to revise the ratings.

I can understand that there are some loop holes in previous ratings scale. But from this year's experience - having seen each and every play patiently - I can really say - how difficult judges's job is. It's really hard to have rankings and ratings and each system of rating has its own loop holes in it.

But yes - we can have a general idea of how colleges have performed this year. I welcome suggestions , comments & disagreements. But again - quality discussion is expected not the blame-game or allegations.

My intention is to have an overall idea about how colleges have performed - and this new revised rating is solely my own view - or my own opinion. It may be wrong ! Judges are more capable than me in selecting final 9 plays.  

Having said that - this new revised ratings don't include today's 3 plays - COEP, PVG Engineering and Trinity College. These three plays can change the whole scenario of the competition. :-) Best wishes to all of them ! I wish all of these colleges make judges's job very hard ! :-)  

Also I won't include MITCOE's play in this list.

Hoping your co-operation !

----------------------------------------------------------------------------------------------------------

Ratings - I have made five main categories namely - A , AB,  B , C & Experimental category.

Category A  

1) BMCC  - Patient
2) Sinhagad Academy - Dumla
3) Cummins - Anvay

Category - Experimental

1) Dnyanganga College - Vaari
2) Sadnyapan Vibhag - Godauun

Category AB - 

1) VIIT - Emotional Locha
2) Kaweri College - Gaavgundi
3) Sinhagad College of Engineering - Hey There Delilah!  ( Comedy genre )
4) MMCC - Logging out

Category B 

1) Dhole Patil College - Teen chaaki Abhaal
2) PVG - 7.5 on Richtor Scale  ( Experimental )
3) IMCC - PL ki SRK
4)  VIT - Uttarardha
5) Sinhagad Architecture - Tutse Naaraaj Nahi Jindagi  ( * )
6) SKN College - Raajdand
7) MMCOE - saavalya
8) ILS - Catch 22

Category C 

1) MIT - Prashnachinha
2) Modern Arts Science and Commerce College - Boys
3) Indira College - Laaldastaa
4) Garware college - Aati Rahengi Bahare
5) Raamkrushna More Mahavidyalay - Navas
6) Fergusson College - Raavipaar 

Monday 29 August 2011

29 August - VIIT, VIM , Dhole Patil College of Engineering

1) VIIT - Emotional Locha 

   Subject - The reality in reality shows and the reality in the lives of the people who create reality shows.

   Story - Gautami - the protagonist of the play is the anchor of a new reality show called Emotional Locha. The show is about solving the problems occurring in people's day to day life - same like Emotional Atyachaar. The brutality and capitalistic & opportunistic nature of the reality show brings frustration in Gautami's life. She quits the show but her friend Bhavin asks her to do it for the last time. She agrees. Eventually she herself becomes the victim of the plan and so called last Extreme Emotional Locha episode. The past of the characters and their histories are revealed in between.

लेखन - गौतमीने देशपांडे ने चांगला प्रयत्न केला आहे पण विषयाची खोली गाठणे गरजेचे वाटते. प्रसंगांच्या सादरीकरणात विषयाची खोली आहे - अशी गल्लत झाल्याचा फील येत होता. 

दिग्दर्शन - संहितेस धरून ! 

अभिनय - ठीक. The depth of the characters is reflected in frontal nature of their representation on the stage. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

पार्श्वसंगीत - नाटकासाठी कंपोज केलेले शो चे गाणे छान होते. बाकी पार्श्वसंगीत उत्तम. 

नेपथ्य - पूरक. 

इमोशनल लोचा नक्की काय झालाय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात - ह्या मूळ विषयाच्या खोलात नाटक शिरलेच नाही. नाटक सुरु झाल्यावर हे उघडपणे कळलेले असते कि हा इमोशनल लोचा ह्या पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यात उलटणार आहे - त्यामुळे फक्त तो आता कसा उलटतोय एवढाच मुद्दा उरतो ! बर तो ज्या प्रकारे गौतमी वरच उलटतो - त्यात एवढा एक्स्ट्रीम लोचा तो काय होता हेच कळत नाहीये. कपल्स मधले मतभेद हा इतका बाऊ करण्यासारखा एक्स्ट्रीम लोचा खरच आहे का - याचा विचार व्हायला हवा. उलट त्यापेक्षा नाटकात सुरुवातीला दाखवलेले लोचे जास्त भीषण होते. हा इमोशनल लोचा स्वतःवरच उलटणार आहे - हा ट्विस्ट वाटत असेल तर त्याची चुणूक सुरुवातीच्या ५ मिनिटातच येते. मी बोल्ड अक्षरात लिहिलेल्या मुद्द्याचा खरच सखोल विचार करणे गरजेचे आहे. But the performance was good. 


Overall Rating -    6.5 - 7.0 
--------------------------------------------------------------------------------------------------------------
2) VIM - Soniya 

    Subject - The hype - blind following of something or someone in life.

    Script - Okay.

    Direction - Okay. The form used was free form.

    Acting - Average.

    Lights - Good.

    Set - Average.

    Overall Rating - 5.5 - 6.0

--------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Dhole Patil College of Engineering - Teen Chaki Abhal 

    This play was a perfect melodrama. People use the word  'melodrama' these days in a very wrong sense. This play was well directed - the characters were thoughtfully developed through their emotions - actions etc.  

    Story - It was a story of a rikshaw wala say - Anna. Anna is a very noble person and very humble, kind, honest character. He is a poor fellow. His son has a very callus attitude towards his wants - and he doesn't think about his family's economical conditions. Anna's daughter is a matured girl. Wife is a typical wife. One day Anna's son demands 500 Rs. Anna goes out to work extra to earn the money. When he returns in the morning - he hears a news about a rape case. His son thinks that Anna did this. Coincidentally the witness of the incident watches Anna's number plate because of which Anna gets caught. Somehow it gets proved that Anna hasn't done it. The bad luck of Anna continues with the people around him blaming Anna for the girls's rape case. Anna's daughter's arranged marriage gets broken. Eventually Anna hears from Bala's ( another rikshaw driver )  mouth that he is the real culprit. Bala is highly drunk that day - Anna forces him to come to police station but Bala meets with an accident and he dies. People blame Anna for Bala's death. Finally Anna commits suicide.


कथा वाचताना ती अतिरंजित वाटण्याची शक्यता आहे - पण यातले सर्व प्रसंग एकाच माणसाच्या आयुष्यात घडू शकतात ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. किंबहुना मेलोड्रामा ह्या फॉर्म चे हेच वैशिष्ट्य आहे. 

लेखन - चांगले. 

दिग्दर्शन - ह्या नाटकाची खरी ताकद त्यातल्या दिग्दर्शनात आहे. सुरुवातीला वेगवेगळे रिक्षावाले समाजात आहेत - हे दाखवण्यासाठी प्रत्येक रिक्षा मध्ये लागणारी गाणी वेगळी वेगळी वापरणे - येथे विचार केल्याचे जाणवते. अण्णाचा समजुतदारपणा - त्याचे कनवाळू असणे - त्याचे उदार असणे - हे अख्ख्या नाटकभर वेगवेगळ्या माध्यमातून रंगवले आहे. मुलाने हट्टाला पेटून पैसे मागितल्यावर आण्णा जेंव्हा घराबाहेर पडतो - तेंव्हा त्याच्या एक्सिट च्या वेळेस त्याची मुलगी कळशीने पाणी घरात आणताना दाखवली आहे - एका अत्यंत छोट्या एन्ट्री मधून किती विचार केलाय याची प्रचीती येते. मुलीने घराच्या बाहेर एक कुंडी ठेवलेली असते - त्याचे प्रयोजन खूपच सुंदर वाटले - रिक्षावाल्याच्या घरात वाढलेल्या समजूतदार मुलीची सगळी स्वप्ने - तिच्या इच्छा आकांक्षा - त्या एका कुंडीतल्या छोट्या रोपाच्या तिथे असण्यातून परिणामकारकपणे उधृत होतात. भावाच्या एन्ट्री ला त्याने त्या कुंडीत चूळ भरणे - त्याच्या पात्राबद्दल क्षणार्धात प्रकाश टाकतात. एका सीन मध्ये रस्त्यावरच पिवळ्या काळ्या रंगाचा प्लाटफॉर्म - अगदी घराच्या आत पर्यंत घुसलेला असणे - यातही विचार केल्याचे जाणवते. बाळा भुजबळ - त्याचा साथीदार - तिथला दक्षिणात्य माणूस - आणि आणखीन एक सद्वर्तनी गरीब रिक्षावाला यांची पात्रेही व्यवस्थित रंगवली गेली होती. त्या दुसऱ्या गरीब रिक्षावाल्याचे एन्ट्री झाल्या झाल्या तिथला एक पेपर घेऊन वाचणे - ह्या एका कृतीतून त्याचे पात्र लख्खपणे उभे ठाकते. शेवटी अण्णाचा मुलगा त्याचा शर्ट घालून बाहेर पडणे - आणि रिक्षावरून हात फिरवणे - सुंदर. रिक्षाला छत नसतानाही केवळ - अण्णाच्या मुलाचे रिक्षाच्या टपावरून हात फिरवणे - ह्या एका कृतीतून - नाटकाच्या नावाला न्याय मिळवून दिला आहे. अनेक बारकावे आहे - जेवढे रिक्षात :-) सॉरी लक्षात ;-)  राहिले तेवढे लिहिले आहेत. आजची सर्वोत्तम एकांकिका म्हणायला हरकत नाही. 

अभिनय - अण्णाचा सुरुवातीचा अभिनय खूप सहज वाटत होता. नंतर नंतर मात्र तो काही प्रमाणात खटकतो. अण्णाच्या बायकोने चांगले काम केले आहे. अगदी सुरुवातीच्या पुणेरी खवचट म्हाताऱ्यानेही चांगले काम केले आहे. आण्णा नाटकाच्या मध्यातच जेंव्हा - आजूबाजूच्या परिस्थितीवर अत्यंत मार्मिक मोनोलोग वगैरे म्हणतो तेंव्हा मात्र - याची काहीही गरज नव्हती असे मनापासून वाटते. एकंदरीत अभिनय अजून जास्त चांगला होऊ शकला असता. 

प्रकाशयोजना - चांगली. 

नेपथ्य - उत्तम. रिक्षा stand वरची वर्तमानपत्रे - त्यावरची सूचना - घरातले अत्यंत कमी पण अत्यंत गरजेचे एवढेच असे नेपथ्य - सुंदर.  स्टेज च्या diagonal dimension चा केलेला वापर चांगला होता. 

संगीत - टिपिकल मेलोड्रामा ला साजेसे असेच.


Overall Rating - 7.0 - 7.25    


Sunday 28 August 2011

28th August - Modern Ganeshkhind, Kashibaii Navale Engineering , Dnyanganga Engineering College

1) Modern Ganeshkhind - Vaadhdivas

   Subject - Kasab

   Story : Kasab commits suicide.

   Script : Average.

   Direction - Average.

   Lights - Average.

   Set - Average.

   Background Music - Average.

   ह्या कोलेज कडून खूप अपेक्षा होत्या - अत्यंत शब्दबंबाळ आणि भाबडी संहिता होती ! :(

   Overall Rating - 3.0 - 4.0

--------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Kashibaii Navale Engg. College - Raajdand 


    Subject - Corrupt social system. 


    Story - There are 5 positions to be filled for the post - Communication Officer in Sachivalay - Mumbai. Three candidates - two boys and a girl - with high qualifications appear for the interview. All of them does a great job in interview and each one is confident to get this job. But all of these positions are filled by the referrals of politicians. These three candidates could see that there is hell lot of corruption in appointing the officers on these posts. They try to protest. They somehow manage to get the file containing the details about how they perform in an interview. They catch the officer named - Tamhankar - who did all this. Eventually they think of making a change in this so called system and they steal the national flag which is going to be used in flag hosting ceremony on 15th August. The play ends with Vinda Karandikar's poem in chorus - Mazya Mana Ban Dagad 


    Script - Good. The frustration of the three candidates was portrayed with correct dialogues. 


    Direction ह्या नाटकाचे दिग्दर्शन संहितेला धरून होते. तीनही उमेदवारांचे समुद्राच्या किनारी ठेवलेल्या सिमेंट च्या ब्लॉक्स पाशी येऊन नैराश्य बाहेर काढणे - अप्रतिम संकल्पना होती. समुद्रकिनारी जसे हे ब्लॉक्स हजारांच्या संख्येने उन-वारा-पाऊस कोणत्याही तक्रारीशिवाय झेलतात - किंवा निर्जीवपणे अव्याहतपणे हा मारा सहन करत असतात - हे ह्यातून दाखवायचे होते. हे ब्लॉक्स म्हणजे कोणताही प्रतिकार न करणाऱ्या समाजातले असंख्य तुम्ही आम्ही सगळे - आणि ह्यांच्या पुढे हे तीन उमेदवार उभे ठाकले आहेत - ही प्रतिमाच अप्रतिम होती. उमेदवारांच्या निवडीची प्रोसेस सुद्धा चांगली रंगवली होती. मुलाखत घेणारे तीनही अधिकाऱ्यांचे काम अजून चांगले होऊ शकले असते ! त्यातही चष्म्याच्या आडून जो अधिकारी बघत होता - त्याचे तसे बघणे - आणि त्याचा तो लूक - यथायोग्यच होता. शेवटच्या १० मिनिटात - नाटक परिणामकारक करण्याच्या फंदात - भरकटत गेले असे वाटले. - माझ्या मना बन दगड - ही कविता नैराश्य अधोरेखित करताना योग्य वाटत होती - पण शेवटी - " ऐका टापा ऐका आवाज - लाल धूळ उडते आज " - हा रेफरन्स विंदांनी - communist विचारसरणी साठी वापरला आहे - तो नाटकाच्या शेवटी आल्याने - " पुन्हा कम्युनिस्ट यावेत आणि क्रांती घडवून आणावी " हा संदेश मुलांना द्यायचा आहे कि काय - असे वाटण्याची शक्यता आहे. त्या ओळींमधली - लाल धूळ - कम्युनिस्ट विषयक आहे - हे विचारात घेणे महत्वाचे आहे. नाटकाच्या शेवटी - नाटकाने आत्तापर्यंत राखलेला वास्तववादी फॉर्म सोडला - आणि उगाचच पथनाट्याच्या फॉर्म मध्ये घुसले. एकंदरीत खूप चांगले दिग्दर्शन होऊ शकले असते. नोकरी न मिळणे - म्हणजे अस्तित्व न उरणे - इतपत ज्या लोकांची अवस्था असते - त्यांची तडफड बाजूलाच राहिली - आणि उगाचच क्रांती वगैरे करण्याच्या नादात - नाटक भरकटले.

अभिनय - नाटकाची सुरुवातच त्या मुलीने अत्यंत नाटकी आवाजात आणि अभिनयात केली. कोणीही लक्षात राहील असा अभिनय केला नसला तरी सर्वांनी नाटकाला कुठेही बोअर सुद्धा होऊ दिले नाही हेही खरे. केबिन च्या बाहेर बसलेल्या - बायीने चांगला संयत अभिनय केला. एकंदरीत खूप सुधारणा गरजेची आहे. 

नेपथ्य - सुरेख. 

प्रकाशयोजना - उत्तम. 

संगीत - ठीक. 

Overall Rating - 6.5 - 7.0 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Dnyanganga Engineering College - Vaari 

अत्यंत फ्रेश आणि सुरेख नाटक ! 

संकल्पना - ह्या नाटकाला एक कथा अशी नव्हती. वारी - हा समान धागा होता. नाटकाची सुरुवात वारीने झाली. सुरुवातीतच नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीपासून एक वारीत सामील होणारा एक - म्हातारा वारकरी जो होता - तो फारच अप्रतिम काम करत होता - अत्यंत सुरेख. पण तो नंतर आलाच नाही. त्याचे बघणे- पाठीत वाकणे - हात थरथरणे फारच अप्रतिम होते. त्याची अभिनयाची समजही खूप आहे हे जाणवत होते. 

वारी - ह्या एका शब्दाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत नाटक पुढे सरकत होते. मग खरी-खुरी वारी, शिक्षणातली मुलांची वारी, नेत्यांच्या भाषणांना गर्दी करणाऱ्या लोकांची वारी असे अनेक प्रसंग येऊन गेले. नाटकाच्या मध्यात - नाटकाच्या मुख्य कथेस सुरुवात झाली. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेस कंटाळलेला एक मुलगा अभियांत्रिकीला प्रवेश मिळवतो. आणि मग - कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशी संबंध नसलेल्या अश्या एका शिक्षण व्यवस्थेशी त्याचा सामना होतो. एकीकडे हा मुलगा आणि दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने निराश झालेला एक शिक्षक अश्या दोन मार्गांवर मग नाटकाचा प्रवास सुरु होतो. शिकवण्याच्या पवित्र अश्या कार्यात - ह्या शिक्षकाची खूपच घालमेल होत असते - कारण त्याच्या कडे काहीतरी शिकायचंय म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा - मार्क्स पाडण्यासाठी व घोकंपट्टी करण्यासाठी नोट्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचीच रीघ त्याच्याकडे लागते. शिक्षकी पेशात आपला विठ्ठल शोधणाऱ्या ह्या शिक्षकास आता त्याचा विठ्ठल गवसेनासाच होतो. शेवटी ह्या विद्यार्थ्याची आणि ह्या शिक्षकाची भेट होते - आणि जणू अगदी प्रामाणिक भक्ताला विठू मिळावा आणि विठूलाही अगदी प्रामाणिक भक्त मिळावा - अशीच दोघांची अवस्था होते. शिक्षकास पुन्हा एकदा शिकवण्यामध्ये - विठू दिसायला लागतो. :-) 

दिग्दर्शन - सुंदर. वारीचे प्रसंग - त्यातले उपरोधिक टोमणे - शिक्षकाची कुचंबणा - घालमेल - विद्यार्थांची होणारी कुचंबणा - अप्रतिम रंगवली होती. शेवटी शब्दशः होणारे विठूचे दर्शन - कळस होता. :-) विषय मांडण्याची कुठेही घाई नाही - कोणताही अभिनिवेश नाही ! नाटकाचा ठेहेराव नाटकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. 

अभिनय - चांगला. वारीतला म्हातारा - आणि कीर्तनकार - उल्लेखनीय ! कीर्तनकाराच्या आवाजाने रसिकांच्या मनांना जिंकले. पण त्याने शेवटी जे जोग रागातले भजन गायले - ते त्याने शास्त्रीय गायक जसा गाईल त्या बेअरिंग मध्ये गायले - तेच जर त्याने शिक्षकाच्या बेअरिंग मध्ये गायले असते - तर मन अधिक भरून आले असते. इतर कलाकारांच्या अभिनयात सुधारणा करण्याची खूप जास्त गरज आहे. किंबहुना - कीर्तनकार आणि शिक्षकानेही वेगवेगळ्या भूमिका वठवताना - वेगवेगळ्या प्रकारचे बोलणे अपेक्षित आहे - तो शिक्षकाचेही काम करताना कीर्तन्कारासाराखाच बोलत होता. एकंदरीत अभिनय अजून खूपच जास्त चांगला होऊ शकतो. 

पार्श्वसंगीत - अभंगांचा - भजनांचा वापर सुंदर. एकंदरीत छान ! 

प्रकाशयोजना - उत्तम. 

नेपथ्य - पूरक आणि पुरेसे.  

प्राथमिक फेरीच्या दृष्टीने नाटकाने जेवढे मार्क्स पडणे अपेक्षित आहे तेवढे नक्कीच पडले आहेत. पण फायनल च्या दृष्टीने नाटकाची वीण अजून जास्त घट्ट बसवणे गरजेचे वाटते. हे एक उत्तम नाटक आहे - आणि क्रमांकात येण्याच्या दृष्टीने असलेल्या सगळ्या गोष्टी ह्यात आहेत !  

अभिनंदन ! :-)

Overall Rating - 7.5 


28 August - Morning Session - Appasaheb Jedhe , Indira College of Commerce & Garware College

1) Appasaheb Jedhe Mahavidyalay - Mohor 

कथा - आंब्यांचे पीक घेणाऱ्या एका बागायतदार शेतकऱ्याची ही कथा ! एके वर्षी त्याच्या आंब्यांच्या झाडांना भरपूर मोहोर येतो. घरातला प्रत्येक जण - आता घरात सुखसमृद्धी नांदणार म्हणून स्वप्ने रंगवत असतो. गावातल्या व्यापाराशी झाडांच्या विक्रीबाबत बोलीही ठरते. पण मुसळधार पावसात सगळा मोहोर नष्ट होतो. शेतकरी स्वतःच्या नशिबावर खूप रागावून झाडे तोडायला निघतो. पण त्याचा लहान मुलगा त्याला सावरतो. शेवटी - तो मुलगा बापाची स्वप्ने उराशी बाळगतो आणि दुसऱ्या वर्षीच्या फुललेल्या मोहोरात - आणि पर्यायाने येणाऱ्या सुखसमृद्धी मध्ये हरवून जातो. 

लेखन - साधे -सरळ लेखन होते. कुठेही साहित्यिक बडेजाव नव्हता. पण सुरुवातीला खूपच भोळसट पात्रे रंगवली आहेत - अश्या प्रकारचे लेखन होते. 

दिग्दर्शन - खूपच जास्त वेळा black outs होते. स्वप्नंरंजनाचे प्रसंग चांगले रंगवले होते. शेतकऱ्याचे मनातून उध्वस्त होणे - अभिनयातून अधिक परिणामकारकपणे दाखवता येऊ शकले असते. त्या प्रसंगात एकंदरीतच खूप आरडा ओरड झाली. पालखी येण्याच्या प्रसंगाची फारशी गरज वाटली नाही. शेतकरी अत्यंत सद्वर्तनी आणि प्रसन्न रंगवण्याच्या नादात - सुरुवातीचे प्रसंग फारच लाडिक लाडिक झाले असे वाटले. त्याचे पात्र रंगवणारा सारखाच प्रसन्न हसण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदरीत सर्व दिग्दर्शन फक्त वर-वरच्याच पातळीवर राहिले असे वाटले. 

अभिनय - ठीक. 

नेपथ्य - मोजके . आंब्याची झाडे स्टेज वर न आणण्याचा निर्णय चांगला होता. :) 

प्रकाशयोजना - चांगली. झाडांसाठी वापरलेला हिरवा लाईट अजून जास्त शार्प करता आला असता. एकंदरीत चांगली. 

पार्श्वसंगीत - काही वेळा खूप जास्त लाउड वाटले. पण एकंदरीत समाधानकारक. 

नाटकाचा शेवट - नाटकास 'मोहोर' हे नाव का दिले याचे विश्लेषण करण्यात झाला - ते थोडे खटकले. एखाद्या सिरीयल चा एपिसोड संपावा तसे नाटक संपले. 

Overall Rating - 6.0

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

2) Indira College of Commerce - Laadasta 


विषय - नक्षलवादी चळवळ - तरुण त्यात कसे ओढले जातात - त्यात ओढल्या गेलेल्यांची सरकार आणि स्वतः त्यांच्यामुळेच कशी दुतर्फा गळचेपी होते इत्यादी ! 

कथा - ( पात्रांची नावे चुकल्यास कृपया माफ करा ) म्हादू आपल्या हलाखीच्या आयुष्याला - व त्यात गुदरलेल्या अन्यायाच्या प्रसंगांना कंटाळून नक्षलवादी लोकांना सामील होतो. तिथे एक दिवस त्यांनी गावातल्या शिक्षिकेस पळवून आणलेले असते. म्हादू शिकलेला असतो. त्या दोघांचे स्वभाव आणि मते जुळतात. एके दिवशी पोलीस स्टेशन वर केलेल्या हल्ल्यामध्ये - म्हादू नक्षलवादी लोकांना सामील झाल्याचे पोलिसांना कळते. शेवटी म्हादू आणि शिक्षिकेच्या मदतीने पोलीस 'लालदस्ता' संघटनेचा खात्मा करतात. :-) नाटकाचा शेवट म्हादू आणि शिक्षिका यांना अपत्य होऊन होतो. 

लेखन - जे हजार वेळा आपण ऐकत आलोय नक्षलवादी संघटनेबाबत तेच मांडले होते. पात्रांची खडाजंगी वगैरे रंगवण्यात लेखक काही प्रमाणात यशस्वी झाला असला - तरी नाटक तेवढ्यापुरतेच राहिले. 

दिग्दर्शन - लेखन व दिग्दर्शन जशास तसे होते. 

अभिनय - मुलीने चांगला अभिनय केला. ( शिक्षिकेने ) म्हादू कधी कधी अभिनय करतोय असे जाणवत होते. नक्षलवाद्यांच्या म्होरक्याने चांगला अभिनय केला. एकंदरीत सर्वांचा अभिनय चांगला होता. 

नेपथ्य - ठीक-ठाक 

प्रकाशयोजना - ठीक. 

पार्श्वसंगीत - ठीक.

Overall Rating - 6 - 6.5 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Garware College - Aati Rahengi Baharen ! 

कथा - साधी सोपी भोळी भाबडी कित्ती कित्ती गोड ! नववीच्या वर्गातल्या नवीन वर्गशिक्षिका दिसायला - वागायला - बोलायला खूपच गोड असतात बुवा ! इतिहासाचे शिक्षक तर खूप्पच छान असतात दिसायला - सगळी मुले बायींवर आणि सगळ्या मुली सरांवर मारत असतात. पण आपल्या वयाचा विचार करता - आपले काही त्यांच्याशी सुत जुळणे शक्य नाही - हे बालकांच्या लक्षात येते. मग ते सरांचं आणि बयींच सेटिंग करायचा जबरदस्त प्लान करतात. वर्गात दुसऱ्या एक शिक्षिका असतात - ज्या ह्या मराठीच्या बायींवर खूप जळत असतात. त्या मुलांना सारख्या सारख्या मारत असतात. मुलांना त्यामुळे त्या मुली अज्जिबात आवडतच नसतात. आणि एक गम्मत सांगू का - मुले कष्टाने हे जे जुळवून आणत असतात ना त्याचा मुली काही उपयोगच नसतो - हे हे हे हे - कारण सरांचं आणि बयींच तर आधीपासूनच प्रेम असतं ना ! पण अत्यंत निरागस ( ??? ) मुलांना मात्र हे माहीतच नसतं. सो स्याड ना :( :( :( आणि हौऊ स्वीट पण ! :):):) शेवटी शाळेचे अधिकारी या प्रेमीयुगुल सर आणि बायींना बडतर्फ करतात ! तेवढ्यात तिकडून दुसऱ्या शिक्षिका येताना मुलांना दिसतात आणि - त्यांच्यावर मुले एकदम लट्टू होतात ! कित्ती कित्ती कित्ती गोड ना ! 

लेखन - खूप खूप खूप स्वीट ! :) 

दिग्दर्शन - एकंदरीत लेखन खूप खूप खूप स्वीट असल्याने दिग्दर्शन म्हणजे तर काय - जम्माडी - जम्माडच ! :) 

नेपथ्य - वर्ग - टेकडीवरचा बाक ! 

प्रकाशयोजना - चांगली. 

पार्श्वसंगीत - ते तर आमचा गुपितच आहे बाबा ! छान ! 

Overall Rating - 5.5 - 6.0 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Saturday 27 August 2011

27th August - ILS , Symbiosys Arts and Commerce College , Shankarro Chavan law College

1) ILS - Catch 22 

    Subject - Tensions between a husband and wife because of career , unwanted pregnancies etc.

    Story : A husband wants a child but the wife doesn't want. She feels that it's better not to have a child rather than having an unwanted child. She herself is an unwanted child of her parents. Her husband is a happy go lucky kind of a person who desperately wants to experience the fatherhood. Eventually she undergoes an abortion and he decides to get a divorce.

   Script - Good.

   Direction - Above average.

   Set - Good.

   Lights - Decent.

   Music - Good.

   नाटकाची सुरुवात अत्यंत कमी संवादांनी पण परिणामकारक झाली. पण नंतर नंतर नाटकाची पकड सुटत गेली. पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या वेदना - जेवढ्या तीव्रतेने पोहोचणे अपेक्षित होते - तेवढ्या त्या पोहोचल्या नाहीत. नाटकात एक चांगले वाक्य येऊन गेले - " तुझ्यातला माझा अंशच उरला नाहीये तर मग आपण एकत्र राहून तरी काय करायचं " ! नाटकातल्या नवऱ्याचे काम ज्याने केले - त्याची आवाज लावण्याची पद्धत कानांना अत्यंत एकसुरी वाटत होती. काही ठिकाणी तो उगाचच ओरडतो आहे असे वाटत होते. मुलीचा अभिनय खटकणारा नसला तरी - तुटक तुटक वाटत होता. नाटक कोणत्याही विषयाच्या खोलात न जाता संपले असे शेवटी वाटले. 

   Overall Rating - 6.0 - 6.5 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

   2)  Symbiosys Arts and Commerce College - Shahanpan Dega Deva 

    Story - A man called Mr. Bhide wants to get admitted to Mental Hospital - because he is frustrated because of the system around him.  :-(

    Script - Average.

    Direction - Average.

    Set  - Average.

    Music - Average.

    Lights - Very very average.

    Overall Rating - 4.5 - 5.0 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

3) Shankarraoo Chavan Law College - Tatkalik Satyache Varkari 

कथा - एका युवकाला - संत तुकारामांचा मुखवटा चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडलेले असते. पण तो काही केल्या त्याचा गुन्हा मान्य करत नसतो. एक दिवस पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदार ठरवतात कि त्याच्याकडून गुन्हा कबूल करूनच घ्यायचा. पण खूप प्रयत्न करूनही त्यांचा नाईलाज होतो. दुसऱ्या सीन मध्ये त्या युवकाच्या मनात तुकाराम प्रकट होतात. दुसरीकडे ह्या पोलीस ठाण्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला - वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या आरोपाखाली अटक केली जाते. शेवटी - तुकारामांचा मुखवटा चोरणारा चोर मुस्लीम आहे असा जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतो. ह्या खुलाश्यामुळे जातीय दंगली होतात. शेवटी पांडुरंग तुकारामांच्या रुपात प्रकट होतो आणि त्या निरपराध चोराची सुटका करून देतात. अर्थात हे रूपकात्मक आहे. 

लेखन - लेखन चांगले होते. लेखनातल्या घडण्यात चांगले नाट्य होते. प्रत्येक माणूस फक्त स्वतःच्या सुखाच्या पोटी दुसऱ्याचा बळी देतोय - आणि त्याच आमिषांना - तात्कालिक सत्य मानायला लागलाय - म्हणून तात्कालिक सत्याचे वारकरीच हल्ली खूप झालेत - अश्या आशयाचे हे नाटक होते. पण स्क्रिप्ट मधल्या बऱ्याच गोष्टी एडिट करता येण्याजोग्या होत्या - त्यामुळे नाटक अजून जास्त चांगले झाले असते. 

दिग्दर्शन - पूरक. नाटकातले तणावाचे प्रसंग चांगले दिग्दर्शित केले होते. 

अभिनय - चांगला. 

नेपथ्य - चांगले होते. 

प्रकाशयोजना - चांगली. 

नाटकाने मध्यात पकड सोडली. तुकारामांची स्वगते गाळता आली असती. तुकारामांचे शेवटी चोराला सोडवणे - जातीय दंगली म्हणून लुटुपुटूची भांडणे करणे - बायका येऊन दिंडी चे नृत्य करणे - ह्या गोष्टींमुळे नाटक उगाचच वाढले आणि अपेक्षित परिणामापासून दूर दूर जात गेले. खरं तर हे नाटक खूप चांगले होऊ शकले असते. 

Overall Rating : 5.5 - 6.0 

----------------------------------------------------------------------------------